या ब्लॉग वर एक संकेत मी आजवर पाळत आलेलो आहे तो म्हणजे 'सोप्या-सुटसुटीत कविताच इथे पोस्ट करणे'. जेणेकरून कुणाही वाचकाला अन्वयार्थ समजावून सांगण्याच्या भानगडीपासून सुटका होईल.
पण खूप दिवसांपासून ब्लॉगवर काहीही पोस्ट केलेलं नव्हतं आणि गेल्या काही काळापासून बोली भाषेतल्या कविता जुळून येत नव्हत्या. आता तर ब्लॉगची गरज म्हणून पोस्ट करणं आलं आहे म्हणून त्यातल्या त्यात सोप्पी अशी ही कविता निवडली आहे.
नाही कळली तरी काळजी करू नका, सोप्या कविताही जमतील पण त्याला वेळ द्यायला हवा आहे…तोपर्यंत धीर धरायला हवा आहे… तुम्ही आणि मीसुद्धा !
पण खूप दिवसांपासून ब्लॉगवर काहीही पोस्ट केलेलं नव्हतं आणि गेल्या काही काळापासून बोली भाषेतल्या कविता जुळून येत नव्हत्या. आता तर ब्लॉगची गरज म्हणून पोस्ट करणं आलं आहे म्हणून त्यातल्या त्यात सोप्पी अशी ही कविता निवडली आहे.
नाही कळली तरी काळजी करू नका, सोप्या कविताही जमतील पण त्याला वेळ द्यायला हवा आहे…तोपर्यंत धीर धरायला हवा आहे… तुम्ही आणि मीसुद्धा !
विसावा !
नाही अनुभवायचं, या दुराव्यातून आता काही
सुखापासून दुःखापर्यंत तसाच चाललोय मी !
वाहू दे जखमांतून रक्त भळभळत तसेच,
वाटा काट्यांच्या मुद्दाम तुडवत आलोय मी !
एकांतातला स्वर्ग जरी अनुभवला नाही कधी ,
परकेपणातल्या यातना पुरत्या अनुभवल्यात मी !
इभ्रतीच्या चामडीची लक्तरे जरी उधळली,
वर पाण्यासाठी मिठाच्या,आग्रह धरलाय मी !
काटेरी पायवाटेत त्या भिजलेल्या,प्रेमाच्या रक्ताने,
छिन्नभिन्न अवशेषही मनाचे,पाहिले होतेच मी !
सत्य अशा स्वप्नांच्या शोधात निघालो पुढे…
आशेवर एकाच,
दुःखाच्या मुक्कामानंतरच प्रेमाचं कुरण असतं…
तिथेच विसावेन मी !!!
- राहुल राजेंद्र कावरे,
अमरावती